ग्रामपंचायत कार्यालय कसे चालते?
सखोल अभ्यास अचूक नियम, शंका तुमची निराकरण आम्ही करणार! |
महाराष्ट्रात मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 व त्या अंतर्गत केलेले नियम यानुसार ग्रामपंचायतीची काम करणे बंधनकारक आहे.
ग्रामपंचायतीने करावयाची कामे पुढील प्रमाणे?
- ग्रामपंचायतींनी त्यांच्या कार्यक्षेत्रात जनतेसाठी पाणीपुरवठा व स्वच्छता रस्ते ,सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन, गावातील पथदिवे इत्यादी सुविधा पुरविणे व सामाजिक आर्थिक सांस्कृतिक मागासवर्गीयांचे कल्याण, महिला व बाल कल्याणाचे विविध उपक्रम हाती घेणे बंधनकारक आहे.
- ग्रामपंचायत हद्दीतील जन्म मृत्यु उपजत मृत्यू, विवाह इत्यादींच्या नोंद घेणे, शासनाने विहीत केलेल्या वेळापत्रकानुसार व गावातील ग्रामस्थांच्या निकडी नुसार ग्रामसभा घेणे क्रमप्राप्त आहे.
- ग्रामस्थांनी मागणी केल्यानुसार ग्रामसभेची व ग्रामपंचायतीच्या ठरावांच्या इतिवृत्ताची प्रत सात दिवसात देणे बंधनकारक आहे.
- केंद्र शासन, राज्यशासन ,जिल्हा परिषद व पंचायत समित्यांनी ग्रामपंचायत कडे सोपविलेल्या योजनांची अंमलबजावणी करणे ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे.
- इत्यादी. … … ..
सरपंचाची कर्तव्य काय आहेत?
- अधिनियमानुसार सरपंच यांना कार्यकारी शक्ती प्रदान केली असून ताे ग्रामपंचायतीचे प्रशासकीय प्रमुख म्हणून कामकाज पाहतो.
- सरपंच पंचायतीच्या सभेचे विनियमन करेल व पंचायतीच्या सर्व अधिकाऱ्यांनी /कर्मचाऱ्यांनी केलेल्या कृती व कार्यवाहीवर व देखरेख व नियंत्रण ठेवेल.
- अधिनियमानुसार आवश्यक असलेली सर्व विवरणे व अहवाल तयार ठेवण्याची व्यवस्था करेल.
- अधिनियमानुसार तसेच शासनाच्या निर्देशाखाली देणे आवश्यक असतील अशी प्राप्ती प्रमाणपत्र आपल्या सहीने व पंचायतीच्या मुद्रेनिशी देतील.
- गाव पातळीवर विविध विकास कार्यक्रम अभियान व योजनेत लोकांचा सहभाग घेऊन गाव समृद्ध करण्याचा प्रयत्न करेल.
ग्रामसेवकांची कामे कोणती?
- ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कामकाज पाहतो.
- ग्रामसभा व मासिक सभेसमोर जमा व खर्च मंजुरीसाठी ठेवणे.
- विविध स्वरूपाचे ग्रामस्थांना दाखले देणे.
- ग्रामपंचायत हद्दीतील वेगवेगळे कर वसूल करणे त्याची नोंद घेऊन कराची रक्कम बँकेत जमा करणे आगामी वर्षासाठी कराची मागणी तयार करून मागणी देयके पाठवणे.
- ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक विहित मुदतीत अधिनियमानुसार तयार करून पंचायत समितीकडे सादर करावे.
- पिकावरील विविध रोगाबाबत ग्रामस्थांना जाहीर दवंडीद्वारे माहिती देणे.
- साथीचे रोग प्रतिबंधक उपाययोजना करणे , पुरेसा टीसीएल साठा ठेवणे व त्याचा पाणी शुद्धीकरणासाठी नियमित वापर करणे.
- गावातील साथीच्या आजारात बाबत प्राथमिक माहिती आरोग्य अधिकारी व गटविकास अधिकारी यांना देणे.
- गावातील पाणीपुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती व संनियंत्रण करणे.
- जन्म मृत्यू उपजात मृत्यू व विवाह यांची नोंदणी करणे.

No comments:
Post a Comment